Thursday, July 30, 2020

#३६# पद्मश्री साहिर लुधियानवी (४)

आपल्याच रुतब्यात साहिर जगला. त्याचा स्वत:च्या शब्दांवर प्रचंड विश्वास होता व हेच आपल्या जीवनाचं सूत्र बनवत तो जगला, ‘पोंछकर अश्क अपनी आँखों से, मुस्कुराओ तो कोई बात बने, सर झुकानेसे कुछ नही होता, सर उठाओ तो कोई बात बने'... 

आपल्या काव्यक्षेत्रातील योगदानाबाबत साहिर यांनी एका शेराद्वारे अत्यंत प्रांजळपणे म्हटलं होतं, ‘दुनिया ने तजुर्बातो-हवादिस की शक्ल में जो कुछ मुझे दिया है, लौटा रहा हूँ मैं.. ( तजुर्बातो-हवादिस की शक्ल मतलब  In the form of experience )

साहिरनं अनेक स्वप्नं बघितली पण ती पूर्ण होऊ शकली नाहीत. ती हुरहूर, सल त्याच्या कवितांमध्ये सतत डोकावत राहिली, " मैने ने चाँद और सितारों की तमन्ना की थी , मुझ को रातों की सियाही के सिवा कुछ न मिला’.. 

जावेद अख्तर एक आठवण सांगतात. ते या क्षेत्रांत नवीन होते तेव्हा अनेकदा साहिरकडे जात, साहिर त्यांच्या वडिलांचे आणि मामाचे मित्र होते. अर्थात वयाचा अडसर त्यांच्या नात्यात कधीच नव्हता कारण शेरोशायरी, काव्य, नज्म़ , गझ़ल असे अनेक धागे होते ज्यामुळे ते एकत्र जोडले गेले होते. एकदा साहिर यांची जावेद अख्तर यांना १०० रुपये दिले. त्याकाळी त्याला खूप किंमत होती त्यामुळे असं ठरलं कि जावेदजी ते पैसे जमतील तेव्हा परत करतील. पुढे 'गीतकार' जावेद अख्तर झाल्यावर सुद्धा त्यांनी ते पैसे परत केले नाहीत त्यामुळे तो विषय त्या दोघांमधला एक गोड नोकझोक करण्याचा असायचा. साहिर जावेदजींना नेहमी चिडवायचे ,"मैं १०० रुपये तुम से निकलवा लूंगा बेटा"…!

आई गेल्यावर साहिर एकटे पडले. एकदा ते आपल्या मित्राच्या डॉक्टर कपुर यांच्या  घरी त्यांची तब्येत पाहायला गेले होते कारण डॉक्टर आजारी होते. डॉक्टरांना पाहायला डॉक्टर सेठ येणार होते. ते येईपर्यंत डॉक्टर कपूर यांचा वेळ जावा म्हणून ते पत्ते खेळू लागले. अचानक साहिर यांना त्रास होऊ लागला व हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टर सेठ पोहोचले पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी जावेद अख्तरला बोलावून घेतले, ते पोचेपर्यंत साहिर गेले होते. काही वेळाने जावेद अख्तर टॅक्सीने त्यांचे शव घेऊन साहिरजींच्या 'परछाइयाँ' या बंगल्यावर पोहोचले. रात्रीचा एक वाजला होता. टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांनी साहिरजीना घरांत आणलं आणि त्यांचा अश्रूंचा बांध फुटला... सकाळ होता होता आजूबाजूला बातमी पसरली, लोक जमू लागले. पुढचे विधी करायला, तयारी करायला जावेदजी बाहेर पडले तर तो रात्रीचा टॅक्सीवाला अजून तिथेच उभा होता, घराच्या बाहेर. त्याला पाहून जावेदजी त्याचाकडे गेले, 'अरे मैने पैसे नही दिये आपको?' असं म्हणत पाकीट काढू लागले पण तो  टॅक्सीवाला पैसे घ्यायला तयार होईना. तो म्हणाला, मी पैशासाठी नाही थांबलो साहेब. तेव्हा जावेदजींनी १०० रुपयाची नोट काढून त्याच्या हातांत जबरदस्तीने ठेवली आणि भरून आलेल्या डोळ्यांनी म्हणाले “ये लो सौ रुपए, इसे रख लो, मर के भी निकलवा लिये उसने अपने रुपये” .. 

मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गये

कुछ आँहें भर कर लौट गए कुछ नग़मे गाकर चले गये

वो भी एक पल का क़िस्सा था मैं भी एक पल का क़िस्सा हूँ

कल तुमसे जुदा हो जाऊँगा वो आज तुम्हारा हिस्सा हूँ, 

मैं पल दो पल का शायर हूँ.... 

कल और आएँगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले 

मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले 

कल कोई मुझको याद करे क्यूँ कोई मुझको याद करे 

मशरूम ज़माना मेरे लिये क्यूँ वक़्त अपना बरबाद करे, 

मैं पल दो पल का शायर हूँ... 


या ओळी ऐकल्या कि वाटत...  साहिर, अजूनही आम्ही तुमची रोज आठवण काढतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुमचीच गाणी सोबत असतात. तुमच्या गाण्यांमधून अजूनही तुम्ही आमच्याच सोबत आहात, साहिर .. आमच्याच सोबत !



No comments:

Post a Comment