Thursday, September 7, 2017

आठवणींच्या पावसांत या
भिजली माझी गाणी ग
ओघळला तो शब्द नि शब्द
कागद कोरा उरला ग
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

तृणपात्यांवर कोसळला तो
मनांत बरसून गेला ग
क्षितिजावरती रंग सावळा
ठेवून मागे गेला ग ,
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

रंग मनाचा अन् क्षितिजाचा
अवघा एकचि झाला ग
इथे सावळा तिथे सावळा
हरवून मजला गेला गं
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग....




 

No comments:

Post a Comment