Tuesday, May 10, 2016

' परत प्रेमात पडायचय…  '

मनातलं बोलता आलं नाही,
म्हणून लिहिली कविता
तर कधी डोळ्यांतील वाचलं नाहीस,
म्हणून लिहिली कविता …

माझ्या या कवितेत
तू कधी होतोस वारा,
तर कधी पौर्णिमेचा चांदवा.
मोरपंखी स्वप्नातला तू ,
कधी त्या बेधुंद पावसासारखा …
मनाच्या गाभाऱ्यातला
एक अलवार तरंग,
तर कधी उमलत्या बहरांमधल
गोड गुलाबी स्वप्नं …

पण कॅनव्हास, ब्रश , कॅमेऱ्यांत
शब्दांची हि भाषा,
तुला कधी कळलीच नाही
आणि तुझ्या रंगांची जादू
मला तशी समजलीच नाही.

घालमेल , हुरहूर, तगमग, ओढ
या शब्दांचे अर्थ जसे उमजत गेले
तसे अलवार मोरपंखी  नाते
अजूनच खुलत गेले ….

आभाळभर पसरलेला काळोख
अन् तो निळा समुद्र किनारा,
मूठभर चांदण घेऊन
त्या चित्रांत रंग भरणारा तू ….
कदाचित तुही तेच सांगत होतास
शब्दांनी नाही तर रंगानी ….

उन्हं कलती झाल्यावर,
त्या पिवळ्याजर्द रानफुलांत
थव्याथव्याने परतणाऱ्या
पाखरांच्या किलबिलाटात
त्या हिरवाकंच रानांत
जणू तू मलाच शोधत होतास …
कारण रंगांची भाषा
आतां मलाही येऊ लागलीए …

अस वाटतंय ,
नव्यान काही लिहावं
अन् त्या नव्या कवितेसाठी
परत प्रेमात पडावं … तुझ्याच  !!!
 
शिशिर …

अनेक ऋतु आले अन् गेले
पण शिशिरातील आठवणींचा मोहर,
आजही कायम आहे.
टपटप गळणाऱ्या पानांच्या,
अविरत झंकारात
आजही उमलत जाते,
एक एक आठवण …. तुझीच

कधी अवेळी दाटून येतं ते मळभ
मनाला हुरहूर लावणार,
हळुवार मागं घेऊन जाणार….

दरवर्षी शिशिरात असाच सजतो,
हा प्रवास,
पालवीपासून या पानगळी पर्यंतचा …. 
एक पुरानी याद हे लौटीं
बारिश में, तनहाई में
ख़ामोशी से छेड़ रही यूँ
कई पुराने अफ़साने

कुछ उसने , कुछ मैंने बोला
अल्फाजो से, आँखों से
दिल की बात ना फ़िर केहे पाए
मौसम बदले रातों में  !!!
रंग अलगत या मनाचे,
आकाशी त्या पांगले 
तू येतां आठवणीत माझ्या,
नभांत फुलले चांदणे 

डोळ्यांत उतरे आतुरता अन्
श्वास होती मोकळे 
दूर रंगले क्षितिजावरती,
आठवणींचे सोहळे …