कॉफी आणि बरंच काही ...
आज सकाळी सकाळी चक्क विवेकचा फोन आला आणि तेही ' संध्याकाळी कॉफी ला सगळे भेटू, ग्रुप वर टाक ' या आदेशासकट. मी फक्त ' सूर्य आज कुठे उगवला ' असं म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवला सुधा, किती हि घाई. 'काय झाल आज याला, काही काम आहे कि सहज भेटायचं आहे ', असे अनेक विचार मनात डोकावून गेले.
विवेक माझा शाळेपासूनचा मित्र. शाळा सोडून पंचवीस वर्ष होऊन गेली पण शाळेने दिलेला मित्र मैत्रींणींचा ठेवा आजही बरोबर आहे आणि म्हणूनच आत कुठेतरी लहानपण अजूनही जिवंत आहे. 'बावळट, मूर्ख' सारखे शब्द आजही यथेच्य विहार करू शकतात या मैत्रीत आणि याच मैत्रीच्या हक्काने काहीही मागू शकतो एकमेकांकडे, नाहीतर बायकोलाही आणली नसेल पण मैत्रिणींसाठी अमेरिकेहून 'पर्स' आणि जपान वरून 'बाहुली' आणणारे हे मित्र तसे दुर्मिळच.
आज सकाळी सकाळी चक्क विवेकचा फोन आला आणि तेही ' संध्याकाळी कॉफी ला सगळे भेटू, ग्रुप वर टाक ' या आदेशासकट. मी फक्त ' सूर्य आज कुठे उगवला ' असं म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवला सुधा, किती हि घाई. 'काय झाल आज याला, काही काम आहे कि सहज भेटायचं आहे ', असे अनेक विचार मनात डोकावून गेले.
विवेक माझा शाळेपासूनचा मित्र. शाळा सोडून पंचवीस वर्ष होऊन गेली पण शाळेने दिलेला मित्र मैत्रींणींचा ठेवा आजही बरोबर आहे आणि म्हणूनच आत कुठेतरी लहानपण अजूनही जिवंत आहे. 'बावळट, मूर्ख' सारखे शब्द आजही यथेच्य विहार करू शकतात या मैत्रीत आणि याच मैत्रीच्या हक्काने काहीही मागू शकतो एकमेकांकडे, नाहीतर बायकोलाही आणली नसेल पण मैत्रिणींसाठी अमेरिकेहून 'पर्स' आणि जपान वरून 'बाहुली' आणणारे हे मित्र तसे दुर्मिळच.
मिळालेल्या आदेशाचे पालन करून मी ग्रुप वर मेसेज टाकला व रात्री आठ वाजता नेहमीच्या अड्ड्यावर ठरल्या प्रमाणे सारे पोहोचले. नेहमीप्रमाणे मी सर्वांत आधी आणि नंतर नीरज, ललीत विवेक व अर्चना सर्वात शेवटी येणार हे कायमचं ठरलेल. कितीही बोललं तरी उशिरा येण्याची सवय अर्चना काही सोडत नाही.
खर तर वयानं मोठे झालो होतो पण या कॉफ़ीच्या नावाखाली अधून मधून लहानपण जगत होतो आम्ही. रोजच्या धावपळीत आणि कामाच्या व्यापात ते निवांत क्षण वेगळी ऊर्जा द्यायचे. महिन्यातून एकदा भेटायचं हे ठरलेलं आणि जमलंच तर अधे मध्ये पण ठरवून भेटायचो. कधी खूप कंटाळा आला म्हणून तर कधी वीकएंड ला चालायला जायचं आणि वैशाली रुपाली मध्ये नाश्ता करायचा हे ठरलेलं.
खर तर वयानं मोठे झालो होतो पण या कॉफ़ीच्या नावाखाली अधून मधून लहानपण जगत होतो आम्ही. रोजच्या धावपळीत आणि कामाच्या व्यापात ते निवांत क्षण वेगळी ऊर्जा द्यायचे. महिन्यातून एकदा भेटायचं हे ठरलेलं आणि जमलंच तर अधे मध्ये पण ठरवून भेटायचो. कधी खूप कंटाळा आला म्हणून तर कधी वीकएंड ला चालायला जायचं आणि वैशाली रुपाली मध्ये नाश्ता करायचा हे ठरलेलं.
"काय झाल रे आज अचानक ' तू ' बोलावलस कॉफीला ?" विवेकला आमचा प्रश्न अपेक्षित होताच. " दोन वर्ष ऑफिसच्या कामाकरता लंडनला जायला सांगितले आहे, अजून तारीख नाही ठरली पण कदाचित महिना अखेर पर्यंत जावं लागेल." एकदम गुगलीच टाकली याने आल्या आल्या. इतक्यात अर्चना म्हणाली, "अरे वा, भारीच कि". नीरज म्हणाला " किती मोठा प्रोजेक्ट आहे? तुझा रोल काय ? तोच कि काही वेगळं काम आहे?" याचे प्रश्न पण एकदम त्याच्याच सारखे असायचे, स्कॉलर स्टाईल. ललित म्हणाला, "अरे सतीश आहे लंडन ला, कोणीच नाही अस नाही रे", पार लंडनला पोहोचला पण हा विचारांत. "अरे एकटा जातो आहेस कि सर्वांना नेतोयेस ? मुलांच शाळेच काय ?आई येणार आहे ना तुझ्याबरोबर ?", माझे प्रश्न एकदम सुटसुटीत होते.
सर्वांचे इतके सारे प्रश्न ऐकून विवेक गोंधळून गेला. "अरे हो हो, किती बोलाल ? दम खा जरा. मी जाणार नाहीये", आतां यॉर्कर होता हा विवेकचा . " ए बावळट काय चालू आहे तुझ ? नक्की सांग काय ते " अर्चना तिच्या अंदाजात सुरु झाली. हैप्पी गो लकी आहे ती . मला मात्र समजेना हा विवेक नक्की काय बोलतोय. समजायला जरा तसा अवघडच आहे तो. इतकी वर्ष झाली तेव्हा आता कुठे त्याचा अंदाज येत होता पण तरी खोली मात्र सापडली नव्हती.
"अरे मला नाही जायचं, कंटाळा आला आहे यार असं कधी एक, तर कधी दोन वर्षांकरता बाहेर जायचा. मुलांचा शाळेचा विचार करून त्यांना इथे ठेवल तर तिकडे मी एकटा. नाही करमत त्यांना आणि मलाही. किती दिवस असं रहायच ? आता नको, बास." विवेकच हे रूप नवीन होत. आत कुठेतरी त्याची चाललेली घालमेल आज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं होती.
करियर साठी नोकरी मध्ये धावतां धावता हातून निसटलेल्या किती तरी लहान सहान गोष्टी आयुष्याच्या एका वळणावर एकदम दिसू लागतात तसं काहीसं झालं होतं त्याचं. एकीकडे मिळालेल यश तर दुसरीकडे हरवलेले काही अमुल्य क्षण !! खरं तर यात तुलना होऊच शकत नाही पण नकळत जेव्हा आपलंच मन हि तुलना करू लागत तेव्हा विचारांचा गुंता होऊन जातो.
विवेकच बोलण ऐकलं आणि क्षणभर सगळेच गप्प झाले. अशा वेळी विचार करून बोलणारा एकच जण होता इथे आणि तो म्हणजे, नीरज. आमचा ग्रुप उगाच नाही स्कॉलर म्हणायचा त्याला. नीरज म्हणाला, ' शांत हो अरे, कुठून कुठे पोचलास. नाही जायच ना, तर सांगून टाक बॉसला. तुला जे वाटतं आहे ते बरोबर आहे कि नाही हे शोधायची गरज काय ? दुसरा कोणी जाऊ शकेल ना या प्रोजेक्ट वर ? मग झालं तर…' बापरे एका मिनिटात प्रश्न सोडवला होता नीरजने. ते ऐकून सुद्धा किती बरं वाटलं. एक यशस्वी सर्जन होऊ शकला असता नीरज असं मला नेहमी वाटतं इतकी स्थिरता आहे त्याच्या विचारात आणि आचारात सुधा. त्याच्या याच गुणाने कदाचित वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करण्याची हिम्मत त्याला दिली असावी.
" वेडा आहे का तू विवेक ? अरे असे चान्स परत परत येत नसतात. जावून ये कि ? काय होतं. हे शाळेचं वर्ष संपल कि घेऊन जा मुलांना. मस्त एन्जॉय कर", अर्चनाने तो माहोल जरा हलका केला. तिचं बोलण सुरु झाल कि गप्प बसाव लागत इतक्या स्पीड ने सुरु होते तिची गाडी. "अरे, चाळीशी आल्यासारखा काय करतोयेस ? आणि आली असली तरी तसं वागायचं नसत. तू जा, मागून आम्ही येऊ. मग जाऊ आपण सगळे युरोप ट्रीपला, आपल नेक्स्ट गेट- टूगेदर तिकडे, काय मस्त आहे कि नाही कल्पना".. कोणाच काय तर कोणाच काय. आता मात्र विवेकला काय बोलावं सुचेना, चीड चीड झाली त्याची.
ललित त्याच्या नेहमीच्या शैलीत हसतं होता. त्याची परीस्थिती काही वेगळी नव्हती. बारा बारा तास कंपनीत तोही असायचाच कि आणि तेही कमी म्हणून रात्री घरून पण काम करायचा. त्यामुळे विवेकच बोलणं त्याला समजतं होतं आणि पटतं सुद्धा होतं. त्यामुळे 'जे ठरवशील ते नीट विचार करून ठरव', हा त्याचा सल्ला अगदी योग्य होता.
मी शांत होते. काहीच बोलले नाही. चाळीशी ओलांडली कि विचारांत घडत असलेला बदल मी स्वतः अनुभवत होते. आयुष्याकडॆ कृतज्ञतेने बघता आलं पाहिजे हा प्रयत्न करत होते. कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत असलेले आपले मित्र मैत्रिणी किती महत्वाचं हे मी अनुभवत होते. वेळप्रसंगी असलेला त्यांचा आधार,व्यक्त होण्यासाठी असलेली हक्काची जागा, एकमेकांबरोबर मोकळेपणाने होणारे संवाद, लुटुपुटुची भांडणं यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध आहे याची लख्ख जाणीव होत होती. त्यामुळे मी त्याला मन जे सांगेल तेच कर हा सल्ला दिला.
इतक्यात ऑर्डर दिलेली कॉफी आली. आज कॉफी पिताना पहिल्यांदा जाणवल कि टेबल वर आलेल्या कॉफी मध्ये बरेच फ्लेवर होते; मोका, कॉल्ड कॉफी, आयरिश कॉफी, कॉफी विथ आइसक्रीम आणि साधी फिल्टर कॉफी सुधा. प्रत्येकाची आवड वेगळी होती पण चव मात्र कॉफीचीच होती…
- कविता मराठे
सर्वांचे इतके सारे प्रश्न ऐकून विवेक गोंधळून गेला. "अरे हो हो, किती बोलाल ? दम खा जरा. मी जाणार नाहीये", आतां यॉर्कर होता हा विवेकचा . " ए बावळट काय चालू आहे तुझ ? नक्की सांग काय ते " अर्चना तिच्या अंदाजात सुरु झाली. हैप्पी गो लकी आहे ती . मला मात्र समजेना हा विवेक नक्की काय बोलतोय. समजायला जरा तसा अवघडच आहे तो. इतकी वर्ष झाली तेव्हा आता कुठे त्याचा अंदाज येत होता पण तरी खोली मात्र सापडली नव्हती.
"अरे मला नाही जायचं, कंटाळा आला आहे यार असं कधी एक, तर कधी दोन वर्षांकरता बाहेर जायचा. मुलांचा शाळेचा विचार करून त्यांना इथे ठेवल तर तिकडे मी एकटा. नाही करमत त्यांना आणि मलाही. किती दिवस असं रहायच ? आता नको, बास." विवेकच हे रूप नवीन होत. आत कुठेतरी त्याची चाललेली घालमेल आज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं होती.
करियर साठी नोकरी मध्ये धावतां धावता हातून निसटलेल्या किती तरी लहान सहान गोष्टी आयुष्याच्या एका वळणावर एकदम दिसू लागतात तसं काहीसं झालं होतं त्याचं. एकीकडे मिळालेल यश तर दुसरीकडे हरवलेले काही अमुल्य क्षण !! खरं तर यात तुलना होऊच शकत नाही पण नकळत जेव्हा आपलंच मन हि तुलना करू लागत तेव्हा विचारांचा गुंता होऊन जातो.
विवेकच बोलण ऐकलं आणि क्षणभर सगळेच गप्प झाले. अशा वेळी विचार करून बोलणारा एकच जण होता इथे आणि तो म्हणजे, नीरज. आमचा ग्रुप उगाच नाही स्कॉलर म्हणायचा त्याला. नीरज म्हणाला, ' शांत हो अरे, कुठून कुठे पोचलास. नाही जायच ना, तर सांगून टाक बॉसला. तुला जे वाटतं आहे ते बरोबर आहे कि नाही हे शोधायची गरज काय ? दुसरा कोणी जाऊ शकेल ना या प्रोजेक्ट वर ? मग झालं तर…' बापरे एका मिनिटात प्रश्न सोडवला होता नीरजने. ते ऐकून सुद्धा किती बरं वाटलं. एक यशस्वी सर्जन होऊ शकला असता नीरज असं मला नेहमी वाटतं इतकी स्थिरता आहे त्याच्या विचारात आणि आचारात सुधा. त्याच्या याच गुणाने कदाचित वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करण्याची हिम्मत त्याला दिली असावी.
" वेडा आहे का तू विवेक ? अरे असे चान्स परत परत येत नसतात. जावून ये कि ? काय होतं. हे शाळेचं वर्ष संपल कि घेऊन जा मुलांना. मस्त एन्जॉय कर", अर्चनाने तो माहोल जरा हलका केला. तिचं बोलण सुरु झाल कि गप्प बसाव लागत इतक्या स्पीड ने सुरु होते तिची गाडी. "अरे, चाळीशी आल्यासारखा काय करतोयेस ? आणि आली असली तरी तसं वागायचं नसत. तू जा, मागून आम्ही येऊ. मग जाऊ आपण सगळे युरोप ट्रीपला, आपल नेक्स्ट गेट- टूगेदर तिकडे, काय मस्त आहे कि नाही कल्पना".. कोणाच काय तर कोणाच काय. आता मात्र विवेकला काय बोलावं सुचेना, चीड चीड झाली त्याची.
ललित त्याच्या नेहमीच्या शैलीत हसतं होता. त्याची परीस्थिती काही वेगळी नव्हती. बारा बारा तास कंपनीत तोही असायचाच कि आणि तेही कमी म्हणून रात्री घरून पण काम करायचा. त्यामुळे विवेकच बोलणं त्याला समजतं होतं आणि पटतं सुद्धा होतं. त्यामुळे 'जे ठरवशील ते नीट विचार करून ठरव', हा त्याचा सल्ला अगदी योग्य होता.
मी शांत होते. काहीच बोलले नाही. चाळीशी ओलांडली कि विचारांत घडत असलेला बदल मी स्वतः अनुभवत होते. आयुष्याकडॆ कृतज्ञतेने बघता आलं पाहिजे हा प्रयत्न करत होते. कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत असलेले आपले मित्र मैत्रिणी किती महत्वाचं हे मी अनुभवत होते. वेळप्रसंगी असलेला त्यांचा आधार,व्यक्त होण्यासाठी असलेली हक्काची जागा, एकमेकांबरोबर मोकळेपणाने होणारे संवाद, लुटुपुटुची भांडणं यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध आहे याची लख्ख जाणीव होत होती. त्यामुळे मी त्याला मन जे सांगेल तेच कर हा सल्ला दिला.
इतक्यात ऑर्डर दिलेली कॉफी आली. आज कॉफी पिताना पहिल्यांदा जाणवल कि टेबल वर आलेल्या कॉफी मध्ये बरेच फ्लेवर होते; मोका, कॉल्ड कॉफी, आयरिश कॉफी, कॉफी विथ आइसक्रीम आणि साधी फिल्टर कॉफी सुधा. प्रत्येकाची आवड वेगळी होती पण चव मात्र कॉफीचीच होती…
- कविता मराठे
No comments:
Post a Comment