Monday, April 7, 2014

                    "  शताब्दीपदार्पण  "

काकूआजीचं शताब्दीपदार्पण हा क्षण आगळा वेगळां
    हळव्या क्षणांनी सजला कौतुकाचा हा सोहळां 

म्हणतात, प्रत्येक क्षणातं काहीतरी आपल असतं
    तिचं निखळ हसू जणू हेच दाखवत असतं

मळभ आल्यावरचा एकटेपणा पावसात अगदी वाहून जातो
    उत्साह तिचा अगदी या पावसासारखा भासतों 

दारातला प्राजक्त दिमाखात फूलतो, नित्य नियमित हसतों 
    जणू तिचाच आत्मविश्वास दररोज तो पाहत असतो

सूकलेल्या झाडाला पालवीसाठी चैत्राची वाट पहावी लागतें 
    ठेंच लागल्यावर तिच्या हाताची ऊब जणू हेच सांगत असतें 

आकाशातल्या चांदण्यांनी रात्र नेहमी छान सजतें
    अमावस्या पौर्णिमा याची तिला भीती नसतें 

दोन दिवसांमधला दूवां म्हणजे हि रात्र असतें 
    नात्यांना एकत्र बांधणाऱ्या तूलाच जणू पहात असतें 

शिंपल्यालाच मोत्याची खरी पारख असतें 
    कारण त्यांची तशीही जूनीच ओळख असतें 

तुझ्या आठवणींची गोष्ट काहीशी अशीच भासते
    त्यांची सोबत तूला नेहमीच हवीशी वाटतें 

शिशिरातली शांतता वसंतातले रंग
    ग्रीष्मातला दाहं अनं श्रावणातील हिरवळं

ऋतूंप्रमाणे निसर्ग नेहमीच स्वत:ला बदलत असतो
    वाटतं, खरचं तूला पाहून आजही तों शिकत असतों  !!!


Saturday, April 5, 2014

सौ. आई व श्री. दादा,
यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी लिहिलेले चार शब्द … 

" सुवर्ण "  सोबतीचा हा सोहळा आहे अगदी खास 
     अन् प्रेमाची हि गोष्ट अधिकच खुलली आज 

कधी चांदण्यांची साक्ष तर कधी प्रीतीची पहाट 
     कधी वादळाची सोबत तर कधी रिमझिम निनाद 

चढ, उतार, डोंगरघाट अन कधी पाऊलवाट 
     सांर सारं होत इथवर चालतांना यांत 

यश, अपयश, आनंद, दु:ख , कधी त्याग तर कधी तडजोड 
    अन् कधी अबोला …. 

संसारात हे इंद्रधनुष्य नेहमीच सजल
     अन् सप्तरंगात समाधान कायमच हसलं 

आयुंष्यातील प्रत्येक नातं किती छांन जपलत 
     प्रत्येक मनांत आठवणींचं एक छानसं कोंदण केलत 

मुलांचा आनंद तुम्ही नेहमीच आपला मानलात 
    अन् अपयशात पाठीवर मायेचा हात ठेवलात 

पंचप्राण तुमचे नेहमीच नातवंडात राहतात 
    दूर आहेत मुले म्हणून डोळेही पाणावतात 

उत्साह तुमचा असाच ओसंडत राहू दे 
     साथ तुमची अशीच एकमेका राहू दे 

म्हणतात सात पाऊले चालून सात जन्मांची सोबत मिळते 
     अन् या सोबतीत आयुष्य असे छांन फूलते ………. 




                          ' रिती ओंजळ '

एका आयुष्यातून मुक्त झालों कि नवा एक जन्म मिळतो,
      अन् परत तोच जूना प्रवास अगदी पून्हा नव्याने घडतो

मूठीत वाटत अगदी पकडून ठेवू ते बालपण परत हरवून जातं,
      आणि आयुष्य पून्हा आपल्याला त्याच वळणावर आणून सोडतं

प्रेमाचा अर्थ समजेपर्यंत गुलाबी धुकं विरून जातं,
      पहाटेच स्वप्न पून्हा डोळ्यामधून वाहून जातं

एकट पडल्यावर परत जणू जूनाच एक धडा मिळतो,
      मुखवट्यांनमागे लपलेला चेहरा हळूच समोर येतो

कित्येक रात्री नशिबाला दोष देण्यात निघून जातात,
      डोळे मात्र अजूनही स्वप्न तिचं पहात असतात

कुठे काय चुकलं हे मनं अजूनही शोधत रहातं,
      दोन टिप पूसायांला वाटतं कोणी हवं असतं

चालतांना त्याच वाटेवर साथ परत नवी मिळते,
      बेधूंद होवून क्षण सारे परत नवी उमेद मिळते

सुखं दू :खाचा लपंडाव असाच खेळ मांडत रहातो,
      अलगत मागच्या पानावरून प्रवास पूढे चालत रहातो

आई वडिलांची स्वप्नं आता आपल्या डोळ्यात हसत असतात,
      त्याच जागेवर त्याच वाटेवर पावले आपली उभी असतात

इवली इवली सोबतं आतां आभाळाएवढी मोठी होते,
      तृप्त होवून जातां जातां ओंजळ मात्र रीती होते …….

Friday, April 4, 2014

'  मैत्री  '

मैत्री  म्हणजे काय …

मनातील ओढ कि अव्यक्त भावना 
  नजरेतला ओलावा अन डोळ्यातला विश्वास 
    कि , नात्यांच्या पलीकडचा अबोल किनारा 

पडल्यावर सावरणारा अंधारातला सोबती ,
  मनातील नि:शब्द आवाज कि आठवणींचा पाऊस 
    मैत्री म्हणजे काय खरंच सांगता येत नाही …… 

चालता चालता थकतो जीव तेव्हा निरागस आठवणी जागवते 
  आयुष्याच्या वळणावरती कुठे तरी हरवते 
    अंन मनातील पाऊलखुणा शेवटपर्यंत जागवते 
         कदाचित हीच मैत्री असते….  कदाचित हीच मैत्री असते… !!!