रोजची संध्याकाळ तितकीच ओढ लावणारी... आकाशातील रंगांची उधळण अन अस्ताला जाणारा तो सूर्य, पश्चिमेला क्षितिजावर रंगणारा हा रंगांचा सोहळा... रोज त्याच उत्साहाने पाहत होते. सूर्यास्त पाहण्याच जणू वेड लागलं होत, हेच खरं...
सूर्यास्ताच्या त्या केशरी सोनेरी रंगात खूप काही दिसायचं....कधी तारुण्याचे ते दिवस, स्वप्नवत.... मन फुलपाखरू होतं जणू... . ना कोणती काळजी , ना कोणता व्याप ; आपल्याच रंगांत रंगलेल, आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेल.. मग हळूहळू दिवस सरले व उडणार मन जमिनीवर आलं. आयुष्याने अनेक रंग हलकेच उलगडून दाखवले... आणि आता या वळणावर ; त्या सूर्याला अस्ताला जाताना पाहून , हातून काहीतरी निसटतंय याची चूटपूट लागली.
निम्मं गेलं आणि निम्मं उरलं, या जाणीवेने मन थोड हळवं झाल. वाटल ... निसटत चाललेल्या या क्षणांत अजून खूप काही मिळवावं ... पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात पोटभर फिरावं, हिरवे डोंगर चढावे, वाफाळलेल्या कॉफी सोबत रात्रभर गप्पांची मैफल सजवावी, लॉन्ग ड्राईव्हला जावं , गाण म्हणाव, स्वच्छ निरभ्र आकाशा सारख खळखळून हसावं, समुद्रकिनारी वाळूत दूरवर अनवाणी चालत राहावं , डोळे मिटून आपलं आवडत गाणं ऐकत सार सार विसरून जावं, मनसोक्त रडावं , एकटेपण सुद्धा अगदी भरभरून जगावं, स्वतः वरती प्रेम करावं, अगदी स्वछंद जगावं .....
उरलेल्या आयुष्याबद्दलच चित्र अजूनच साफ होत गेलं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. रोजच्या काल पेक्षा आज किती सुंदर आणि वेगळा साजरा होईल, हे पाहणच महत्वाचं....
शेवटी काय.... तर आपल्या आयुष्याच्या कॅनवास वरती कोणते आणि किती रंग भरायचे, हे आपणच ठरवायला हवं .....
सूर्यास्ताच्या त्या केशरी सोनेरी रंगात खूप काही दिसायचं....कधी तारुण्याचे ते दिवस, स्वप्नवत.... मन फुलपाखरू होतं जणू... . ना कोणती काळजी , ना कोणता व्याप ; आपल्याच रंगांत रंगलेल, आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेल.. मग हळूहळू दिवस सरले व उडणार मन जमिनीवर आलं. आयुष्याने अनेक रंग हलकेच उलगडून दाखवले... आणि आता या वळणावर ; त्या सूर्याला अस्ताला जाताना पाहून , हातून काहीतरी निसटतंय याची चूटपूट लागली.
निम्मं गेलं आणि निम्मं उरलं, या जाणीवेने मन थोड हळवं झाल. वाटल ... निसटत चाललेल्या या क्षणांत अजून खूप काही मिळवावं ... पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात पोटभर फिरावं, हिरवे डोंगर चढावे, वाफाळलेल्या कॉफी सोबत रात्रभर गप्पांची मैफल सजवावी, लॉन्ग ड्राईव्हला जावं , गाण म्हणाव, स्वच्छ निरभ्र आकाशा सारख खळखळून हसावं, समुद्रकिनारी वाळूत दूरवर अनवाणी चालत राहावं , डोळे मिटून आपलं आवडत गाणं ऐकत सार सार विसरून जावं, मनसोक्त रडावं , एकटेपण सुद्धा अगदी भरभरून जगावं, स्वतः वरती प्रेम करावं, अगदी स्वछंद जगावं .....
उरलेल्या आयुष्याबद्दलच चित्र अजूनच साफ होत गेलं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. रोजच्या काल पेक्षा आज किती सुंदर आणि वेगळा साजरा होईल, हे पाहणच महत्वाचं....
शेवटी काय.... तर आपल्या आयुष्याच्या कॅनवास वरती कोणते आणि किती रंग भरायचे, हे आपणच ठरवायला हवं .....